Weather
25°C
Latur
light rain
25° _ 25°
72%
7 km/h
Mon
27 °C
Tue
29 °C
Wed
33 °C
Thu
30 °C
Fri
22 °C

Follow US

अकोल्यात पुन्हा दुहेरी हत्याकांड, साखरझोपेत पत्नी अन् चिमुकलीला संपवलं

अकोला: अकोला पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडानं हादरला आहे. येथे पतीनेच पत्नीला आणि पोटच्या

निवडणुकीच्या धामधुमीत शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला

मुंबई :  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department)  खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला

मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको, शरद पवारांचा हल्लाबोल

अमरावती: देशाचे आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र

10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील (Pune Crime News)  वाघोली येथील  एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील

२२ जानेवारी १९८० च्या ‘त्या’ रात्री काय घडलं?

अभिनेते अमिताभ बच्चन  आणि  चित्रपटसृष्टीत मोठा काळ गाजवलेली अभिनेत्री रेखा  यांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती असल्याचं बोलले जाते. रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली, पण त्याची चर्चा नेहमीच होताना दिसते. अनेकदा रेखा मुलाखतींमध्ये आपल्या मनातलं बोलतात.  मात्र, रेखासोबतच्या अफेअरच्या अफवांवर अमिताभ बच्चन यांनी कधीही मौन सोडले नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांचे नाते जगासमोर आणावे अशी रेखा यांची इच्छा होती, असं म्हटलं जातं. मात्र, असं कधीच घडलं नाही आणि पुढे काय झालं हे समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेडी झालेल्या रेखाने असे काही केले ज्यानंतर अभिनेत्री आणि बिग बी यांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, सत्य काय होते, हे फक्त रेखा किंवा अमिताभ बच्चन यांनाच माहीत आहे. खरंतर, 22 जानेवारी 1980 हा दिवस होता, जेव्हा ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचे लग्न झाले होते. या दिवशी सर्वांचे लक्ष वधू-वराकडे असणं अपेक्षित होतं, पण, सर्वांच्यानजरा रेखांकडे रोखल्या गेल्या. ऋषी कपूर नीतू सिंह यांच्या लग्नात रेखा ज्या अवतारात पोहोचल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि फक्त त्यांच्यावरतीच रोखल्या. याचं कारण म्हणजे रेखा एखाद्या नव विवाहित महिलेप्रमाणे सिंदूर लावून फंक्शनला पोहोचल्या होत्या. रेखाच्या कपाळावर सिंदूर लावलेले पाहून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आणि रेखा आणि अमिताभ यांचे लग्न झाले का? यावर कुडबूज सुरू झाली. त्या रात्री रेखा यांच्या लूकचे फोटो अनेक मासिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. पण लग्न झाले की नाही हे गुपितच राहिले. मात्र, नंतर जेव्हा रेखाला केसांना सिंदूर लावण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, फॅशन म्हणून  त्या सिंदूर लावतात. त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की, त्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने सिंदूर लावत नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करत होती. मात्र, त्यांच्या व्यक्तिगत नात्याबद्दल अनेक अफवा होत्या. अमिताभ यांनी कधीही रेखाशी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नव्हता, तर रेखा नेहमीच त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत राहिल्या. अनेकदा असे सांगितले जात होते की रेखा यांनी अमिताभ आणि जया यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप केला होता, पण यासंदर्भात कधीही ठोस माहिती समोर आलेली नाही. जया यांनी अमिताभ यांना रेखा सोबत काम करायचं नाही असंही सांगितल्याच्या चर्चा होत्या, तरीही हे दोघे एकत्र काम करत राहिले.

Team Daily Yashwant Team Daily Yashwant

141 निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाचे नविन फर्मान

नवी दिल्ली : संसदेच्या या हिवाळी अधिवेशन काळात आतापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.  या १४१ निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून नवीन नोटीस जारी करण्यात आली आहे.  यात त्यांना काही सूचना

Daink Yashwant, Latur Team Daink Yashwant, Latur Team