दुबई : महेंद्रसिंग धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. पण जे रोहित शर्माने ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू करून दाखवलं आहे ते धोनीलाही जमलेलं नाही. धोनीच्या नेतृत्वाखालीच रोहित शर्मा भारताच्या संघात आला. धोनी कर्णधार असताना भारताने जेव्हा २००७ साली टी २० वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी रोहित शर्मा त्या संघात होता. पण त्यानंतर जेव्हा धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ साली वनडे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मात्र रोहित शर्मा हा भारताच्या संघात नव्हता. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पण धोनीलाही जी गोष्ट मजली नाही ती गोष्ट आता रोहित शर्माने करून दाखवली आहे.
- Advertisement -
रोहित शर्माला आयपीएलचा राजा म्हटले जाते, कारण त्याने मुंबई इंडियन्सला जेतेपद जिंकवून दिले होते. पण त्यानंतर रोहित शर्माने भराताला गेल्या वर्षी टी २० वर्ल्ड कप जिंकवून दिला. रोहितने २०२४ साली अमेरिका आणि वेस्ट इंडिय येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रोहित शर्माने आता यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला जिंकवून दिली आहे. धोनीने तीन आयसीसीच्या स्पर्धा जिंकल्या आहेत तर रोहितने दोन स्पर्धांचे जेतेपद भारताला जिंकवून दिले आहे. पण तरीही रोहित शर्माने जे केलं आहे, ते धोनीला करता आलेले नाही.
- Advertisement -
धोनीने भारताला २००७, २०११ आणि त्यानंतर २०१३ साली आयसीसीच्या स्पर्धा जिंकवून दिल्या. पण रोहितने भारताला २०२४ साली टी ० वर्ल्ड कप जिंकवून दिला. त्यानंतर रोहितने आता म्हहणजेच २०२५ साली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली आहे. रोहितने सलग दोन वर्षे भारताला आयसीसीची स्पर्धा जिंकवून दिली आहे, जी गोष्ट धोनीलाही जमली नाही. धोनीने कधीच सलग दोन वर्षांत भारताला आयसीसीचे जेतेपद जिंकवून दिले नाही, पण रोहितने मात्र ते केले आहे. त्यामुळे धोनीला न जमलेली गोष्ट आता रोहितने करून दाखवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक आता सर्वत्र होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर तर रोहित शर्माल चाहत्यांनी मनाच्या देव्हाऱ्यात स्थान दिले आहे.
- Advertisement -

