नवी दिल्ली: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेटने पराभूत झाला. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, अहमदाबादची खेळपट्टी अंतिम फेरीत अतिशय संथ होती आणि या प्रकरणावरही प्रश्न उपस्थित केले गेले. आता आयसीसीनेही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील खेळपट्टीचे रेटिंग केले आहे. ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अंतिम सामन्यात वापरलेल्या खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिले आहे.
- Advertisement -
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची खेळपट्टी अतिशय संथ खेळत होती. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने केवळ २४० धावा केल्या, ज्याचा ऑस्ट्रेलियाने सहज पाठलाग केला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सेमीफायनललाही आयसीसीने सरासरी रेटिंग दिली आहे.
- Advertisement -
आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी २०२३ च्या विश्वचषक फायनलच्या खेळपट्टीचे मूल्यांकन केले आहे. जवागल श्रीनाथ (ICC रेफरी आणि माजी भारतीय गोलंदाज) यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या खेळपट्टीचे मूल्यांकन केले. याशिवाय भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर वानखेडेच्या खेळपट्टीला चांगले रेटिंग मिळाले आहे. सेमीफायनलच्या खेळपट्टीवर बराच गदारोळ सुरु होता. शेवटच्या क्षणी खेळपट्टी बदलण्यात आली आणि जुन्या खेळपट्टीवरच सामना खेळवण्यात आला.