चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आदित्य-एल1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ चं लाँचिंग झालं आहे. यासोबतच भारताने एक नवा इतिहास रचला आहे. आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल.
- Advertisement -
आदित्य-L1 ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-XL रॉकेटने अवकाशात सोडण्यात आलं आहे. XL प्रकारची ही २५ वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड २ वरून हे प्रक्षेपण झालं. हे रॉकेट १४५.६२ फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचे वजन ३२१ टन होते. चार टप्प्यात हे रॉकेट आदित्य-एल१ ला अवकाशात सोडणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट आदित्यला त्याच्या नियुक्त कक्षेत सोडेल. प्रक्षेपणानंतर सुमारे एक तासाने आदित्य-एल१ त्यांच्या नियुक्त कक्षेत पोहोचेल. आदित्य-एल१ चे वजन १४८०.७ किलो आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे ६३ मिनिटांनी आदित्य-एल१ अंतराळयान रॉकेटपासून वेगळे होईल. या रॉकेटच्या सर्वात लांब उड्डाणांपैकी हे एक आहे.
चांद्रयानाप्रमाणेच आदित्य यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करेल.
– त्यानंतर या यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकाधिक लंबवर्तुळाकार केल्या जातील.
– यानातील प्रणोदकाच्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल.
– या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल.