सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उदाहरण म्हणजे चंदिगढची महापौर निवडणूक

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 18 Views 2 Min Read
2 Min Read

चंदीगडमध्ये आप, भाजप आणि काँग्रेस यापैकी कुणाला बहुमत नव्हतं. निवडणूक आयोगानं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली त्यांनी आप काँग्रेसची आठ मतं बाद केली होती.  सर्वांच्या समोर मतपत्रिकेतील मतं काढून त्यावर फुली मारुन ते बाद केलं, ते शंभर टक्के बेकायदेशीर कृत्य होतं. सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सांगितलं. सुप्रीम कोर्टानं ताशेरे मारले, ती मतं ग्राह्य धरली आणि आपचा महापौर झाला. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उदाहरण चंदीगडचं होतं. कोर्टानं याबाबत तीव्र मतं मांडली आहेत. याचा अर्थ आज राज्यकर्ते कोणत्याही मार्गानं विरोधकांना बाजूला प्रयत्न करतात, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मी, पण आमच्या प्रकरणात तसाच निकाल घेतला गेला. पक्षाची स्थापना मी केली, घड्याळ चिन्ह दुसऱ्याला दिलं. आम्हाला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे. निवडणूूक आयोगाकडे अर्ज करुन चिन्ह घेण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे मारले, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

अशोक चव्हाणांचा निर्णय सर्वांसाठी आश्चर्यकारक होता. पण, मला तो आश्चर्यकारक वाटत नाही. भाजपनं एक श्वेतपत्रिका काढली होती,त्यात आदर्श प्रकरण आणि अशोक चव्हाण यांचं नाव होतं. मला वाटलं तो धमकावण्याचा प्रकार होता आणि त्याचा परिणाम होता, असं शरद पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना आम्ही एकत्र बसतो काम करतो याचा अर्थ विलीनीकरण नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

कोल्हापूरमध्ये आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, चंदीगड महापौर निवडणूक प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय, कांदाबंदी यासंदर्भात भाष्य केलं. इंडिया आघाडीतील काही घटकपक्षांमध्ये वाद आहेत. वेगवेगळे पक्ष एकत्र येत आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये अडचणी आहेत. पश्चिम बंगालमधील पक्ष पारंपरिकपणे एकमेकांच्या विरोधात आहेत. वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय, असं शरद पवार म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या वतीनं मल्लिकार्जून खरगे सहभागी होतात. महाराष्ट्रातील जागावाटपच्या चर्चेत मी नसतो. जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत एकत्र बसून चर्चा करतात. उद्या त्यांची बैठक होत आहे,अस शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात मविआची बैठक उद्याच आहे, चर्चा होईल दोन तीन दिवसात काय होतू ते पाहू, असं त्यांनी म्हटलं.

Share This Article