भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा

Daink Yashwant, Latur Team
Daink Yashwant, Latur Team 11 Views 1 Min Read
1 Min Read

चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव ट्रेन मधील ४० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सर्व ४० प्रवाशांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते.  रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती ससून रुग्णालयाचा देण्यात आली होती. पण, सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

चेन्नईहून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रेत अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली होती. ही बाब पुणे रेल्वे प्रशासनाला काळवण्यात आली होती. मध्यरात्री ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तातडीने ससून रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टर रेल्वे स्टेशनवर उपचारासाठी दाखल झाले. ४० प्रवाशांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रवाशांची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व ४० प्रवाशांची प्रकृती आता स्थिर आहे. पण, अन्नातून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे जात आहे. या बाबत अधिक तपास आता रेल्वे प्रशासन करत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

Share This Article